
१९९२ साली एक बाबरी मशिद पाडताच मुस्लिम जगाने एवढा हंगामा केला, परंतु त्यानंतर सर्व मुस्लिम राष्ट्रांत हजारो मंदिरांची मोडतोड करण्यात आली त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. तस्लिमाने एक मुसलमान असुनही हिंदुंच्याबाजूने लिहीलेली ही कथा विलक्षण आहे. यात तिने १९९२ च्या दंगलीनंतर घडलेल्या घटनांचे सविस्तर वर्णन केले आहे. काही ठिकाणी हे वर्णन भलतेच लांबले आहे, पण आपण ते टाळूनही पुस्तकाचे वाचन करु शकतो. या दंगलीचा सुरंजन या आशावादी हिंदु कुटुंबावर झालेला परीणाम, सुरंजनची मनोवस्था, त्याचे वडील सुधामय बाबूंचा बांग्लादेशमधिल जातीय सलोख्यावरील विश्वास आणि देशप्रेम, त्याची आई किरणमयी हिची हतबलता यासर्वांचे सुरेख वर्णन तस्लिमा बाईंनी केले आहे. या मुळ बंगाली भाषेतील पुस्तकाचा मराठी भाषेत लिना सोहोनी यांनी केलेला अनुवाद अतिशय सुरेखा झाला आहे.
तसे पाहीले तर या पुस्तकात लेखिकेने इस्लाम धर्माविषयी कोणतीही टीका अथवा टीप्पणी केली नाही आहे. तरी या पुस्तकावर बांग्लादेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम समाज या लेखिकेवर संतप्त असून तिच्यावर हल्ले आणि फतवे काढण्यात आले आहेत. सध्या लेखिका भारतात आश्रीत असून तिला सुरक्षेच्या कारणावरुन राजस्थानमध्ये वास्तव्य करावे लागते आहे. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षही मुस्लिम समाजाची नाराजी टाळण्यासाठी लेखिकेला भारतात कायमचा आश्रय देण्यास तयार नाही. केवळ वोट बॅंक जपण्यासाठी हे राजकीय पक्ष काहिही करण्यास तयार असतात. या पुस्तकात बांग्लादेशमध्ये घडत असलेली एक सत्य घटना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ एका ठराविक समाजाची नाराजी टाळण्यासाठी त्यावर बंदी घालणे अथवा तिच्या लेखिकेला निर्वासित करणे म्हणजे मानवतेला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला काळिमा फासण्यासारखे आहे.
No comments:
Post a Comment