Tuesday, August 22, 2006

Deception Point by Dan Brown (दर्जा : ****)

“When a NASA satellite discovers an astonishingly rare object buried deep in the Arctic ice, the floundering space agency proclaims a much-needed victory. A victory with profound implications for NASA policy and the impending presidential election. To verify the authenticity of the find, the white house calls upon the skills of intelligence analyst Rachel Sexton. Accompanied by a team of experts, including the charismatic scholar Michael Tolland. Rachel travels to the Arctic and uncovers the unthinkable : evidence of scientific trickery. A bold deception that threatens to plunge the world into controversy. But before she can warn the President, Rachel and Michael are ambushed by a deadly team of assassins. Fleeing for their lives across a desolate and lethal landscape, their only hope for survival is to discover who is behind this masterful plot. The truth, they will learn, is the most shocking deception of all.”

मी सहसा इंग्रजी पुस्तके वाचत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असल्याने इंग्रजी भाषेत मी फारसा पारंगत नाही. इंग्रजी भाषेतील पुस्तके समजत असली तरी त्यांचा रसास्वाद घेता येत नाही. परंतू अनेक वर्ष इंग्रजी भाषेचा संपर्क आल्याने आता हळूहळू त्या भाषेचा आस्वाद मला घेता येतोय. याचे श्रेय मला टाईम्स ऑफ इंडीया या इंग्रजी दैनिकाला द्यावीशी वाटते. या इंग्रजी वर्तमानपत्राच्या सातत्यपुर्ण वाचनाने आपला इंग्रजीचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. याशिवाय इंग्रजी भाषेतून घेतलेले संगणकाचे ज्ञान आणि तदनंतर इंटरनेटची मुशाफीरी यांनीही माझी इंग्रजी सुधारण्यात चांगलाच हातभार लावला.

पुस्तक वाचनास सुरुवात केल्यानंतर मी प्रथमच प्रसिध्द लेखक डॅन ब्राऊन यांची डिसेप्शन पॉइंट ही कादंबरी वाचण्यास घेतली. हे पुस्तक वाचायला घेण्यापुर्वी त्यामध्ये काय आहे, अथवा डॅन ब्राऊन यांची लेखनशैली कशी आहे, याबद्दल मला यत्कींचीतही कल्पना नव्हती. परंतू हे पुस्तक हातात घेताच अगदी पहिल्या पानापासूनच मी त्याच्या प्रेमात पडलो. विषय माझ्या आवडीचा अर्थात विज्ञानकथा अधिक अमेरिकन राजनीती असा होता. त्याचबरोबर डॅन ब्राऊन यांच्या सहजसुंदर आणि उत्कंठावर्धक भाषाशैलीने मला खिळवून ठेवले आणि हे पुस्तक पुर्णपणे वाचण्यास भाग पाडले.

या पुस्तकाची कथा वर इंग्रजीत दिल्याप्रमाणे अस्तीत्वासाठी झगडणारी अमेरीकन अंतराळसंस्था नासा आणि राष्ट्रपतीपद मिळवण्यासाठी चाललेली उमेदवारांची जीवघेणी चढाओढ यांची आहे. महत्वाच्या मोहिमांत सातत्याने अपयश आल्याने हतबल झालेली अमेरीकन अवकाशसंस्था नासा कुठल्यातरी जोरदार यशाच्या शोधात असते. या हतबलतेतून मार्ग काढण्याठी एक उच्चपदस्थ अधिकारी एका नव्या शोधाचा बनाव रचतो. तो बनाव उघड होऊ नये म्हणून त्याला अमेरीकेच्याच सैनिकी कमांडोंचा उपयोग अमेरीकी नागरीकांचेच हत्यासत्र सुरु करावे लागते.
हा बनाव उघडकीस आल्यास विद्यमान अमेरीकेचे अध्यक्ष, जे नासाचे कट्टर समर्थक असतात, त्यांची पुनर्निवडणूक धोक्यात येऊ शकते. आणि त्यांचे विरोधक जे नासाला अमेरीकेचे निरर्थक उधळपट्टी करणारे बाळ समजतात, ते निवडून येऊ शकतात. हे टाळण्यासाठी कुठल्याही थराला जायची त्या अधिकाऱ्याची तयारी असते. या जीवघेण्या संघर्षात नायक मायकेल टॉलंड आणि नायीका राचेल सेक्सटन हे दोघेही सापडतात. व कथेच्या अंती तेच या रहस्याचा उलगडा करतात. एकंदरीत यापुस्तकाची कथा एखाद्या देमार इंग्रजी चित्रपटाला साजेशी आहे. भविष्यात या कादंबरीवर आधारीत चित्रपट आल्यास आश्चर्य वाटू नये.

पुस्तकाची कथा छान आहे. शेवट पर्यंत खलनायक कोण हे वाचकापासून लपऊन ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. लेखकाची लेखन शैली उत्कृष्ट आहे. त्यानी या पुस्तकाचे लिखाण अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत केले आहे, त्यामुळे इंग्रजी कच्चे असलेल्या वाचकांनाही ते पचवण्यास अवघड नाही. संपुर्ण पुस्तकात लेखकाने क्लिष्ट वैज्ञानिक माहीती दीली आहे, ती सर्वसाधारण वाचकाला जड जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यासही चालू शकेल. वाचकाला अमेरीकन समाज, त्यांची विचारसरणी, त्यांचा इतिहास, त्यांची वैज्ञानिक आणि लष्करी प्रगती, त्यांच्याकडे अध्यक्षांना देंण्यात येणारे अनन्यसाधारण महत्त्व याची माहिती असल्याच हे पुस्तक अधिक समजेल व त्याचा पुर्ण रसास्वाद घेता येईल.

मी वाय. सी. - यादवराव पवार (दर्जा *****)

“मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील बेताज बादशहा वरदाभाई उर्फ वरदराजन मुदलियार याचे साम्राज्य उध्वस्त करणा़ऱ्या वाय. सी. पवार नावाच्या पोलीस खात्यातील झंझावाताची ही आत्मकथा. संकल्प पक्का असेल आणि ध्येय निश्चित असेल तर साध्या कुटुंबात जन्म घेतलेला एक पोलीस अधिकारी गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि दंगली यांच्यावरही अंकुश ठेवू शकतो. चांगुलपणाचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि कठोरतेचे जिवंत प्रतिक असलेल्या या सच्चा पोलीस अधिकऱ्याचे वादळी आत्मचरित्र एकूणच खचलेल्या समाजजीवनाच्या अंध:कारात आशेचा किरण ठरेल.”
माझा जन्म मुंबईत झाला. १९७२ पासून ते १९९६ पर्यंतचा काळ मी मुंबईत काढला. मुंबईत असताना या महानगराचे फायदे जसे झाले तसेच त्याच्या समस्यांचीही जाण झाली. भारतभरहून येणाऱया नशिब आजमावणाऱ्यांचे लोंढे आणि त्यांना आश्रय देणाऱ्या येथील झोपडपट्ट्या. ह्या झोपडपट्ट्या म्हणजे गुन्हेगारांचे आगार झाले होते. पोलीसही त्यांना हप्त्यासाठी साथ द्यायचे. अशावेळी वाय. सी. पवार या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याचे आगमन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत मुंबईतल्या गुन्हेगारीचा पुरता बिमोड केला. तो मी स्वत: अनुभवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मी वाचायला घेतले.
लेखन अतिशय सुरेख झालेले असून धावते आहे. त्यामुळे कुठेही रटाळपणा आलेला नाही. वाय. सींचे आयुष्य प्रसंगांनी भरलेले असल्यामुळे ३६८ पानांचे पुस्तक लिहूनही बऱ्याच गोष्टी त्यांनी थोडक्यात आवरत्या घेतल्या आहे. बऱ्याच ठीकाणी व्याकरणाच्या चुका असून एखाद्या भाषातज्ञाकडून प्रूफ तपासावयास हवे होते. एकंदरीत पुस्तक अतिशय सुंदर असून वाचक ते वाचताना भारवून जातो. सध्याच्या परीस्थितीत जेव्हा इमानदार पोलीस सापडणे दुर्मिळ झाले आहे, वाय. सी. पवारांच्या कारकीर्दिकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

मराठीतील निवडक विज्ञानकथा संपादन : निरंजन घाटे दर्जा (****)

“विज्ञानकथा हा प्रकार मराठीमध्ये तसा नवा नाही. इ.स.१९०० पासून मराठीत विज्ञानकथा लिहिली जात आहे. तेव्हापासूनच्या गेल्या शंभर वर्षातील प्रातिनिधिक विज्ञानकथा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने एकत्र केलेल्या ह्या विज्ञानकथा वाचताना विज्ञानकथेचे स्वरुप कसे बदलत गेले तेही आपल्या लक्षात येते.
मराठी विज्ञानकथेच्या गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीत अनेक मोठमोठ्या लेखकांचा हातभार लागला आहे. मराठी विज्ञानकथेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या संग्रहातील कथा जशा उपयोगी आहेत त्याच बरोबर एकविसाव्या शतकात जाताना मराठी विज्ञानकथेचे साहाय्यही वाचकाला होईल यात शंकाच नाही.”
विज्ञानकथा हा पुर्वीपासून माझा आवडीचा विषय आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन असल्याकारणानेही त्यातली तांत्रीक क्लीष्टता मला त्रास देत नाही. या कथा वाचण्यापूर्वी विज्ञानातील काही पायभूत नियम आणि माणसाची वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळातील अपेक्षा वाचकाला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या कथा पुर्णपणे काल्पनिक असुन अतिशयोक्तीपुर्ण आहेत असा समज होण्याची शक्यता आहे. विज्ञान कथा म्हणजे सध्याच्या प्रचलीत विज्ञानाच्या पायावर उभारलेली परंतु भविष्याच्या संभाव्य वैज्ञानिक प्रगतिचा कळस असलेली काल्पनिक कथा असते. ती काल्पनिक असते पण कपोलकल्पित मात्र नसते.
ज्यांना जुन्या काळातील एच. जी. वेल्स, जुल्स व्हर्न या लेखकांनी लिहिलेल्या विज्ञान कथांचा परिचय आहे, त्यांना हे निश्चितच पटेल की विज्ञानकथा म्हणजे अतिशय कल्पक आणि कुषाग्र बुध्दीच्या लेखकाने भविष्याचा घेतलेला वेध असतो. या लेखकांनी एकोणिसाव्या शतकात, ज्यावेळी माणूस उडू शकतो असे म्हणणाऱ्या माणसांना वेडे समजले जायचे, विमानांची आणि अवकाश यानांची कल्पना केली होती आणि त्यावर विज्ञानकथा लिहिल्या होत्या. गंमत म्हणजे त्यानी केलेला कल्पनाविलास आज बऱ्याच अंशी खरा ठरलेला आहे. विज्ञानकथा माणसातील वैज्ञानिक जागा करतात आणि त्याला भविष्याचा वेध घ्यायला लावतात, म्हणून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुलाचा बौधिक आणि वैज्ञानिक विकास घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने त्याला विज्ञानकथा, कादंबऱ्या पुरविणे आवश्यक आहे.
या पुस्तकात श्री निरंजन घाटे यांनी विसाव्या शतकातील मराठी विज्ञानकथा आणि विज्ञानकथाकारांवर दीर्घ संशोधन करुन वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळे विषय आजमावणाऱ्या १८ अतिशय सुंदर विज्ञानकथांचा संग्रह पेश केला आहे. त्यांचा या विषयावरील अभ्यास दांडगा आहे. स्वतः एक विज्ञानकथाकार असल्याने या विषयाची त्यांना चांगली समजही आहे. यापुस्तकासाठी त्यानी २० पानी लांबलचक प्रस्तावना लिहीली आहे, ती काही मला आवडली नाही. प्रस्तावना कधीही एक-दोन पानांपेक्षा जास्त लांब नसावी असे माझे मत आहे. या प्रस्तावनेत त्यानी विज्ञानकथा म्हणजे काय, ती कशी असावी आणि बऱ्याच लोकांनी विज्ञानकथेच्या नावाखाली हिन दर्जाच्या साहित्याचा कसा बाजार मांडला आहे याचे प्रदिर्घ विवेचन केले आहे. माझ्यामते याविषयावर वाद घालण्यासाठी एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना ही योग्य जागा नव्हती.
या पुस्तकातल्या सर्व १८ कथा अप्रतिम आहेत यांत काही शंका नाही, परंतु अनु. क्र. १ आणि २ च्या जुन्या काळातील “चंद्रलोकातील सफर” आणि “बायकांना उजव्या डोळ्याने दिसत नाही” या कथा काहिशा सुमार दर्जाच्या आणि रटाळ आहेत. कथा जुन्या काळातील असल्याने आणि बहूतेक, संपादकांच्या म्हणण्याप्रमाणे त्या विदेशी साहीत्यांचे स्वैर अनुवाद असल्या कारणाने, लेखकांना निटशा हाताळता आल्या नाहीत. दुर्दैवाने पुस्तकाच्या आरंभिच दोन कथा रटाळ असल्याने निरस होतो. परंतु बाकीच्या सर्व कथा मात्र उत्तम दर्जाच्या आहेत. संपुर्ण संग्रहात “गिनिपिग” “कनेक्शन” आणि “कालदमन” या कथा मला सर्वात जास्त आवडल्या. प्रत्येक विज्ञानप्रेमीने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.

Monday, August 21, 2006

जगाची मुशाफिरी - निरंजन घाटे दर्जा ****

आज मी जगाची मुशाफिरी हे निरंजन घाटे यांनी लिहीलेले पुस्तक वाचून संपवीले. निरंजन घाटे हे एक उत्कृष्ट विज्ञानकथा लेखक असून काही वेळा इतर किरकोळ लेखनही करतात. त्यांची लेखनशैली सुबोध असून ओघवती आहे, त्यामुळेच ते माझे आवडते लेखक आहेत. हे पुस्तक प्रवासवर्णन असल्याप्रमाणे वाटते परंतू लेखकाने कुठेही प्रत्यक्ष प्रवास केल्याचे म्हटलेले नाही. त्यात जागाच्या कानाकोपऱ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचे यापुस्तकात वर्णन असल्यामुळे त्यासर्व जागी प्रवास करणे लेखकाला अशक्य असल्याचे वाटते.
पुस्तकात एकूण ८८ पृष्ठे होती. ५ सप्टेंबर २००५ ला हे पुस्तक मी वाचावयास सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर २००५ ला संपविले. नुकतेच सभासदत्व पत्करलेल्या सदाशिव पेठेतल्या मराठी साहित्य परीषदेच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मी मिळवले होते. हे पुस्तक आणि आणखिन एक पुस्तक अनिल काळे यांनी अनुवादीत केलेले ट्रीनिटिज चाईल्ड मी साहित्य परीषदेतून सभासद झाल्यानंतर प्रथमच घेतले. वेळ न पुरल्यामुळे ट्रीनिटिज चाईल्ड हे पुस्तक पुर्ण वाचू शकलो नाही.
पुस्तकाचे लेखक निरंजन घाटे हे एक भूगोलतज्ञ असून पुण्यातच रहातात. विज्ञानविषयक दृष्टीकोन आणि ज्ञान यांचा सर्वसाधारण समाजामध्ये प्रसार करणे हा घाटे यांचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे त्यांचे लिखाण सोपे आणि तांत्रिक क्लिष्टता टाळणारे असते. त्यामुळे माझ्यासारख्या विज्ञानप्रवीण माणसाला त्यांचे लिखाण अपुरे वाटण्याची शक्यता आहे. परंतू घाटे यांचा वाचकवर्ग सर्वसामान्य माणूस आहे हे लक्षात घेतल्यास ते योग्यच असल्याचे जाणवते.
या पुस्तकात लेखकाने जगातल्या विविध देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण ठीकाणांची आणि तिथल्या लोकांची मनोरंजक माहीती दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे एक लेख संग्रह असून तो कुठल्या वर्तमान पत्रात प्रसिध्द झाला होता का याचा लेखकाने कुठेही उल्लेख केलेला नाही. पुस्तकात दिलेली माहिती संक्षीप्त आणि मनोरंजक आहे. पुस्तकात अनेक व्याकरणाच्या चुका असून प्रकाशकाने त्याकडे लक्ष पुरविलेले दिसत नाही.
पुस्तकात एकूण १९ लेख असून लेख क्रमांक ७ जो युरोप मधल्या प्रसिध्द कलाकृतींच्या चोऱ्यांच्या संदर्भात होता मला विशेष करुन आवडला. लेख क्रमांक १० मध्ये लेखकाने मध्य भारतात सापडलेल्या डायनोसॉरच्या अंड्याविषयी लिहीले आहे. त्यात स्थानिक भारतियांनी कसे या अंड्यांना शिवलिंग समजून त्याभोवती मंदीर बांधून त्याची पुजा चालू केलेली आहे याचे वर्णन आढळते. हा लेखही मला आवडला. लेखकाने हे सर्व लेख लिहिण्यासाठी अनेक संदर्भग्रंथांचा वापर केला असल्याचे दिसते. परंतू लेखकाने कुठेही त्यांचा उल्लेख केलेला नाही. ही एक मोठी चूक असून माझ्या सारख्या संशोधक वृत्तीच्या माणसाला अधिक माहीती साठी संदर्भ सुचीचा मोठा उपयोग झाला असता. परंतू आजच्या युगात इंटरनेटवर कुठल्याही गोष्टीचा शोध घेणे सहज शक्य असल्याने जाणकार माणसाला तशी काही अडचण भासण्याची शक्यता नाही.

Sunday, August 20, 2006

China builds model of Indian border 2400 km away

The discovery of what is considered a military establishment in China’s Northern plains by a Google Earth user from Germany has kicked up a storm on the Net’s strategic forums. Here’s why: The establishment, snapped from Google’s free satellite imagery software, houses a startlingly accurate scale model of a highly sensitive stretch of the disputed Sino-Indian border.
A careful study of the model, located at a large military complex in China’s Huangyangtan province, likely used for training and familiarisation of troops, helicopters and infantry vehicles, shows that it is built to scale based on a stretch 2,400 km away along the Aksai Chin area bordering Ladakh, part of the stretch through which invading Chinese forces entered in the 1962 war.
The facility, full with uncharacteristic and man-made snow peaks, glacial lakes and snow rifts—ironically in the middle of an arid plain—is flanked by a large military depot with buildings and at least a hundred military trucks.
The Army did not confirm that it was aware of the facility, but officially told The Indian Express, “Militaries are always known to simulate potential conflict zones as a standard practice. There is absolute peace and tranquility on the border with China, a disputed border that the two governments are resolving through peaceful dialogue. It is nothing alarming, these are standard training methodologies.”
Off the record, though, an officer currently with the Quarter Master General branch, but who has served along the border with Aksai Chin, said, “We knew that they had some facilities for this purpose but the scale and detail is something new to us.”
The sense is that economic development near the border and a quiet, but progressive peace dialogue to end the border dispute notwithstanding, the PLA is keeping its forces well in touch with potential conflict zones— especially Aksai Chin, strategically important to Beijing since it houses crucial road heads and Demchok, one of the principally disputed zones.
The image could be anything between six months and two years old, proving that training on disputed terrain is still very much part of the PLA’s war doctrine.